Click Me Join Us Join Learn More Click Here Download Now Contact Us

AFG Vs NZ Test : Grater Noida Stadium Test रद्द का ? Afghanistan नं परत न येण्याचा इशारा का दिला ? नक्की विषय काय आहे ?

AFG Vs NZ Test: Grater Noida Stadium Test रद्द का ? Afghanistan नं परत न येण्याचा इशारा का दिला ?

AFG Vs NZ Test : बीसीसीआय चा ईतिहास 

AFG Vs NZ Test
AFG Vs NZ Test 


साल 1933 भारतात पहिली टेस्ट मॅच झाली होती. त्यानंतर मागच्या 91 वर्षात अनेक टेस्ट मॅचेस भारतात खेळल्या गेल्या. जागतिक क्रिकेटमध्ये बीसीसीआय सगळ्यात पावरफुल आणि श्रीमंत क्रिकेट संघटना बनली.so 

आयपीएल आणि जाहिरातींमधून एवढे पैसे आले की भारतात ठीक ठिकाणी स्टेडियम्स तयार झाले. भारत अफगाणिस्तान सारख्या टीमला आपल्या देशातले स्टेडियम्स होम ग्राउंड म्हणून देऊ लागला. इन्फ्रास्ट्रक्चर पैसे सुविधा ग्लॅमर सगळ्या बाबतीत भारतातलं क्रिकेट टॉप लेव्हलला पोहोचलं.so

2020 नंतर चार वर्षांच्या गॅपन आयसीसी ला भारतीय माणूस चेअरमन म्हणून मिळाला.and थोडक्यात सगळीकडे हवा वाढली आणि मग ग्रेटर नोएडा मध्ये एक टेस्ट मॅच नक्की झाली. AFG Vs NZ Test  दोन्ही टीम्स आल्या त्यांनी तयारी केली. पण मॅचचा एकही बॉल पडला नाही.

मॅच रद्द का झाली ?

पण यापेक्षा दुःखद हे होतं की ही मॅच व्हावी म्हणून ग्राउंड फॅन न सुकवण्याचा प्रयत्न झाला.so  शेजारच्या प्रॅक्टिस फिल्ड वरचे गवताचे तुकडे कापून मेन ग्राउंडवर चिटकवण्यात आले. या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली झाली. आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं पुन्हा कधीच इकडे येणार नाही असं स्टेटमेंट दिलं .because 

पण ग्रेटर नोएडाच्या ग्राउंडवर नेमकं काय झालं ? bcci काय चुकलं ?  पाहूयात या ब्लॉग मधून. आधी बघूयात.but

अफगाणिस्तान भारताच्या ग्राउंडवर त्यांच्या टेस्ट मॅचेस का खेळतं ?

तर bcci अफगाणिस्तानच्या टीमला सुरुवातीपासून मदत केली.  त्यांना प्रॅक्टिस आणि मॅचेस साठी भारतातले काही ग्राउंड्स दिले. त्यातलंच एक होतं ग्रेटर नोएडाचं शहीद विजयसिंग पतीक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. जिथं अफगाणिस्तान या आधीही खेळलं होतं पण यावेळी आपण AFG Vs NZ Test मॅचेस साठी लखनऊ आणि देहराडून मधल्या स्टेडियमची मागणी केली. and

पण बीसीसीआय ने आपल्याला तीन स्टेडियमचे पर्याय दिले कानपूरचं ग्रीन पार्क, बेंगलोरचं चिन्नास्वामी, आणि ग्रेटर नोएडाचं स्टेडियम यात आपण ग्रेटर नोएडाचं स्टेडियम निवडलं असा दावा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने केलाय. so 

दिल्ली उत्तर प्रदेश मध्ये अफगाणिस्तानच्या मॅचेस साठी गर्दी होते. त्यामुळं इथे ही गर्दी होण्याची अपेक्षा होती. पण इथं AFG Vs NZ Test मॅचचा ना टॉस झाला. आणि ना मॅच पण मॅच झाली का नाही तर याचं because 

AFG Vs NZ Test पहिलं कारण होतं  : पाऊस

आता समजा. मॅचच्या दिवशी पाऊस पडला आणि त्यामुळे मॅच झाली नाही तर यात बीसीसीआय ची चूक कशी काय ? तर टेस्ट मॅचच्या पहिल्या दोन दिवशी पाऊस पडलाच नाही. पाऊस पडला मॅच व्हायच्या आदल्या दिवशी. so 

पण त्यानंतर पहिले दोन दिवस ग्राउंड सुकवण्यात गेले. आता कोणत्याही  इंटरनॅशनल मॅचेस होणाऱ्या ग्राउंडला ड्रेनेज सिस्टीम चांगली असते. बेंगलोरच चिन्नास्वामी किंवा पुण्याचं गहुंज इथलं स्टेडियम यात पाऊस पडून गेल्यावर काही मिनिटात ग्राउंड सुकत. पण ग्रेटर नोएडाच्या स्टेडियम मध्ये मात्र ही परिस्थिती दिसून आली नाही. but 

  1. Operation Bhediya : यशस्वी का झालं नाही ? भीती पसरवणारे लांडगे की संकरीत कुत्रे ?  

कारण पहिल्या दिवशी ग्राउंड सुकवायला पंखे आणले गेले ब्रश आणले गेले एका बाजूला ड्रेनेज मधून पाणी काढलं जात होतं पण तरीही ग्राउंडमध्ये ओले पॅच राहत असल्यानं मॅच खेळवता येत नव्हती. परिस्थिती इतकी वाईट होती की साधा टॉस सुद्धा झाला नाही .and

मग दुसऱ्या दिवशीही पाऊस पडला नाही पण तरीही ग्राउंड ओलं पाहिलं मिड ऑन आणि मिड ऑफ ला प्लेयर्स फिल्डिंगला थांबतात. त्या ठिकाणी ग्राउंड एवढं ओलं होतं की शेजारच्या प्रॅक्टिस आउटफील्ड मधले गवताचे पॅचेस काढण्यात आले.so

आणि ते मेन ग्राउंडवर चिटकवण्यात आले याचेही फोटो व्हायरल झाले. आणि  पाकिस्तान आणि बांगलादेशच्या चाहत्यांनी माप काढली. त्यानंतर पुढचे तीन दिवस अधून मधून पाऊस पडत राहिला आणि ग्राउंड सुकण्याची मॅच होण्याची आशा संपल्यात जमा झाली.because

AFG Vs NZ Test : मॅच न होण्याचं दुसरं कारण 

फेल गेलेलं मॅनेजमेंट या ग्राउंडवर शेवटची इंटरनॅशनल मॅच खेळली गेली 2020 मध्ये,  तेही अफगाणिस्तान विरुद्ध आयरलँडमध्ये.  त्यानंतर पुन्हा एकदा इथं खेळण्यासाठी अफगाणिस्तानच आलं. पण मागची चार वर्ष इथं ना डोमेस्टिक क्रिकेट झालं. and 

आणि ना इंटरनॅशनल क्रिकेट त्यामुळे जेव्हा इथं इंटरनॅशनल टेस्ट मॅच होणार हे नक्की झालं तेव्हा हे ग्राउंड उभारणाऱ्या जीएनआयडीए कंपनीनं 60 लाख रुपयांची गुंतवणूक करून ग्राउंड तयार करायला सुरुवात केली. because 

मॅनेजमेंटचा डाव फसला

 इथला मॅनेजमेंटचा डाव एवढा फसला की इंटरनॅशनल मॅच घेण्यासाठी जी ड्रेनेज सिस्टीम असायला हवी ती नव्हती . सोबतच जेव्हा पाऊस पडायला लागला तेव्हा सगळं ग्राउंड कव्हर करेल इतकी कव्हर सुद्धा ग्राउंड्समॅन कडे नव्हती. 

साहजिकच मैदानावर पॅचेस तयार झाले. इथे जेव्हा इंटरनॅशनल मॅचेस होतात तेव्हा मॅनेजमेंट कडून एक एक्सटर्नल एजन्सी हायर केली जाते .आणि मग मॅच पार पाडण्यासाठी जे काही करावं लागतं त्या कामाची जबाबदारी या एजन्सीकडे दिली जाते. and 

पण ग्रेटर नोएडाच्या ग्राउंडवर यावेळी ग्राउंड्समन म्हणून भाड्याने माणसं आणावी लागली. अशी माणसं ज्यांनी कधीही क्रिकेटच्या ग्राउंडवर कामच केलं नव्हतं. साहजिकच त्यांच्याकडूनही चुका होत गेल्या आणि ग्राउंड काही मॅचसाठी तयार झालं नाही. because

जर एखादं इंटरनॅशनल ग्राउंड असेल तर तिथं मॅचेस होत नसतानाही देखरेख  ठेवली जाते. ग्राउंडचा मेंटेनन्स वेळोवेळी पार पाडला जातो. खास करून पावसाळ्यात जास्त देखभाल केली जाते. 

पण इथे इंटरनॅशनल टेस्ट मॅच होणार हे नक्की झाल्यावर ग्राउंड मॅनेजमेंट तयारी करायला सुरुवात केली.  आणि डाव हुकला तो हुकलाच. 

AFG Vs NZ Test : तिसरं कारण 

 इथं डोमेस्टिक मॅचेस होत नसताना इंटरनॅशनल मॅचेस खेळवण्याची चूक 2016 मध्ये या ग्राउंडवर दिलीप. ट्रॉफीच्या डे नाईट मॅचेस पिंक बॉलवर खेळवण्यात आल्या होत्या. bcci पहिल्यांदाच असा प्रयोग केल्यानं त्याची चर्चा झाली, पण त्यानंतर bcci असेल किंवा उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन इथं डोमेस्टिक मॅचेस घ्यायलाही हात आखडता घेऊ लागले. and 

2019 मध्ये झालेली दिल्ली विरुद्ध हरियाणा ही कुजबिहार ट्रॉफीची मॅच इथे झालेली शेवटची डोमेस्टिक मॅच होती. तेही त्यावेळेस इतर कुठलंच ग्राउंड उपलब्ध नव्हतं म्हणून जर उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनला एनसीआर मध्ये डोमेस्टिक मॅचेस घ्यायचे असतील तर ते मोहन मिकिन्स ग्राउंड आणि नेहरू स्टेडियम मध्ये मॅचेस घेतात. so 

पण ग्रेटर नोएडाच्या या स्टेडियम मध्ये नाही म्हणजेच ज्या स्टेडियमकडे त्या राज्याचं क्रिकेट असोसिएशनच दुर्लक्ष करतं तिथं दोन देशांमधली इंटरनॅशनल टेस्ट मॅच खेळायचं ठरलं .आणि 91 वर्षांच्या इतिहासात भारतात पहिल्यांदाच एखादी टेस्ट मॅच एकही बॉल न पडता अगदी टॉसही न होता रद्द झाली. so 

या सगळ्यात बीसीसीआय ची इज्जत कशी काय गेली  ?

 तर या ग्राउंडची जबाबदारी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनची आहे. आणि बीसीसीआय ने करप्शनच्या आरोपांखाली 2017 मध्ये या ग्राउंडवर बंदी घातली होती. असा दावा आता करण्यात येतोय पण तरीही भारतातल्या क्रिकेटचा संपूर्ण कंट्रोल बीसीसीआय कडे आहे. but 

त्यामुळे त्यांनाच यासाठी जबाबदार धरण्यात येतंय कारण ज्या ग्राउंडवर बीसीसीआय डोमेस्टिक मॅचेस घेत नाही. ते ग्राउंड बीसीसीआय न इंटरनॅशनल मॅचचा पर्याय म्हणून अफगाणिस्तानला दिलं तिथेच झाला .फौल त्यानंतर ग्राउंड झाकायला पुरेसे कव्हर्स नसणं मॅच सुरू करायचे असताना. so 

कव्हर्स कमी पडतायत हे लक्षात आल्यावर दुसरीकडून कव्हर्स आणणं फॅन आणि ब्रशन ग्राउंड सुकवायचा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टी कॅमेरावर दिसल्या . त्यात काही माध्यमांनी ग्राउंडमध्ये जेवणाची भांडी टॉयलेट मधल्या पाण्यानं धुतली अशाही बातम्या दिल्या.and

जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असणाऱ्या बीसीसीआय कडे सुविधा नाहीत का ?

साहजिकच जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असणाऱ्या बीसीसीआय कडे या साध्या सुविधा नाहीत का असा प्रश्न विचारला जाऊ लागला.  2023 मध्ये आयपीएल फायनल वेळी जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या मोदी स्टेडियम वर स्पंज वापरून पिच चुकवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही दिसून आलं होतं.but 

त्यानंतर वर्ल्ड कप मध्ये न्यूझीलंडच्याच प्लेयर्सन भारतातल्या ग्राउंडच्या आउटफील्ड मुळे दुखापती होत असल्याची आणि ही आउटफील्ड जागतिक दर्जाची नसल्याची टीका केली होती.आता त्याच न्यूझीलंडच्या प्लेयर्सला भारतात येऊन पाच दिवस नुसतं बसून राहावं लागलं.

त्यांची टेस्ट मॅच झालीच नाही एका बाजूला bcci जगातली सगळ्यात श्रीमंत क्रिकेट संघटना म्हणून लौकिक आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल न्यूट्रल ठिकाणी घ्यावी पुढे जाऊन भारतात घ्यावी यासाठी बीसीसीआय चे प्रयत्न सुरू आहेत. 

मिस मॅनेजमेंटमुळे भारतातल्याच एका ग्राउंडवर टेस्ट मॅच होत नाही!

ज्याला पाऊस हे फक्त निमित्त असतं आणि विषय गणतो तो मिस मॅनेजमेंटमुळे त्यातही गोष्ट आणखी नाचक्की करणारी ठरते. जेव्हा अफगाणिस्तानचे प्लेयर्स आणि क्रिकेट बोर्डाचे अधिकारी आम्ही परत इथे येणार नाही. because

मागच्या चार वर्षात इथली परिस्थिती बदललेली नाही यापेक्षा जास्त चांगल्या सुविधा आम्ही अफगाणिस्तान मध्ये तयार केल्या आहेत, असं म्हणतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं लांबचा फायदा बघण्याच्या नादात बीसीसीआय जवळच्या गोष्टीचे नुकसान करून घेतलंय का ? तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

हेही वाचा  : 

  1. गणपती आरतीला PM Narendra Modi : CJI DY Chandrachud यांच्या घरी गेले, कायदा मोडला का ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या